विवेकशून्यता
पक्षांसाठी पिण्याचे पाणी बहुतेक जणं ठेवतात..तेव्हा हे त्यांनी नक्की पाहिलं असणार..विशेषत: छोटे पक्षी त्या पाण्यात स्वत:ला बुचकळून आधी अंघोळ करतात आणि नंतर तेच पाणी चोचीने पीऊन उडून जातात. किती साधा सरळ विचार..हे काय दिसतंय..पाणी..याचा उपयोग कशासाठी.. अंघोळ करण्यासाठी आणि पिण्यासाठी.. मग हे पिण्याचं पाणी, यात अंघोळ कशी करणार हे असले प्रश्न पक्षांना कधी पढत नाहीत. माणूस ठरला विकसनशील! सतत विकासाच्या शोधात!..बौद्धिक विकास, आर्थिक विकास, सामाजिक विकास ही अशी माणसाची घोडदौड सुरू राहिली.. मात्र ही सर्व प्रगती होत असताना माणूस त्याच्या मूलभूत नैसर्गिक प्रेरणांपासून दूर जात राहिला आणि स्वत:चा विवेक व वास्तवाचं भान हरवून बसला. हे माझं, हे त्याचं, हा माझा, तो माझा नाही, या जास्तीच्या समजुती तयार झाल्या. नियम, कायदे माणसाने स्वत:च तयार केले, पण या जास्तीच्या 'अकलेमुळे' कायदेही तोच मोडायला लागला..आणि आश्चर्य म्हणजे असं करत असताना त्याला जराही लाज किंवा अपराधीपणाची भावना वाटली नाही, ना कधी पश्चात्ताप झाला. मीही माणूस, ज्याचं मी नुकसान करतो तोही माणूसच हा साधा विवेक तो हरवून बसला.. आणि याही...