न जाणलेले भगतसिंह
दिनांक 28 सप्टेंबर 1907...शहीद भगत सिंह संधू यांचा जन्मदिवस..आपण भगत सिंह , सुखदेव आणि राजगुरु या महावीरांची आठवण काढतो आणि त्यांना वंदन करतो ते 23 मार्च 1931 साठी..ज्या ऐतिहासिक दिवशी हे तिघे वीर पुरुष हसत हसत, भारतासाठी फासावर चढून शहीद झाले. पण आज भगत सिंह यांच्या जन्मदिनी त्यांच्या बद्दल लिहावंसं वाटलं ते वेगळ्या कारणासाठी.. "शेतात बंदूक पेरली तर त्यातून हजार बंदुका उगवतील"...लहानग्या भगत चे हे विचार.. भारत देशाप्रति असलेला श्रद्धा व समर्पण भाव, आपल्या देशावर असलेलं नितांत प्रेम आणि देशाला सशस्त्र क्रांतीतून स्वातंत्र्य मिळावं हे रक्तातंच असलेलं भगत सिंह नावाचं हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होतं. देशासाठी आपलं घरदार सोडण्यापासून ते पंडित चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सोशलिस्ट रीपब्लिकन असोसिएशन ची स्थापना होईपर्यंतचा मोठा काळ भगत सिंह यांनी पाहिला.. या सगळ्या दरम्यान अनेक घडामोडी घडत गेल्या.. रिकाम्या पोटी काहिही काम करणं जिथे अशक्य असतं तिथे पोटाला चिमटा लावून , वेळप्रसंगी 8-8 दिवस उपासमार करून, भगत सिंह आणि त्यांचे साथीदार लढत राहिले ते भारत भूमी स्वतंत्र