Posts

Showing posts from December, 2021

रामदरा

Image
रोजच्या धावपळीतून थोडा बदल सगळ्यांना हवाच असतो . अशावेळी जेव्हा मोठ्या सुट्टीवर जाणं शक्य नसतं तेव्हा आपल्या आजूबाजूलाच इतकी सुंदर ठिकाणं लपलेली असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. फेसबुक च्या माध्यमातूनच अशा  ठिकाणची माहिती मिळाली व आज याच निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा योग आला ते म्हणजे पुण्याहून अंदाजे ३० किमी वर असलेलं 'रामदरा' देवस्थान.    लोणीकाळभोर रस्त्यावर असलेलं हे मंदिर अतिशय शांत व आवर्जून भेट द्यावी असं आहे. वनवासात जायला निघाले असता प्रभू श्रीराम येथे वास्तव्याला होते असं म्हणतात. इथेच त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. पुढे अनेक वर्षांनी उज्जैन च्या जुनादत्त आखाड्याचे  महंत देवीपुरी महाराज यांना दृष्टांत होऊन त्यांनी हे ठिकाण शोधलं व त्याचा जीर्णोद्धार केला. त्यांनी समाधी घेतल्यानंतर पुढे हे कार्य त्यांचे शिष्य मंगलपुरी महाराजांनी सुरु ठेवले. या दोघा महंतांच्या प्रतिमा इथे पहायला मिळतात.    रामनवमी किंवा महाशिवरात्री च्या उत्सवाचा काळ हा अर्थातच इथला गर्दी खेचणारा काळ. अन्यथा अतिशय निवांतपणे पोहचून दर्शन घेता येण्यासारखे आहे. तळ्याच्या मध्यभागी शिवलिंगाची स्

समतोल...   

Image
  "आम्ही पैसा नसेल कमावला पण आम्ही माणसं कमावली ..." आपल्या परिचयाच्या ज्येष्ठ पीढी चे प्रतिनिधी (आजोबा , आजी) बऱ्याचदा हे वाक्य म्हणतात. हा विषय अलीकडे घरातही निघाल्यामुळे माझी उजळणी झाली. मुळात या गोष्टी एकत्र होऊच नयेत का, असा प्रश्न , हे विधान ऐकल्यावर नेहमी पडतो. नशिबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालावायची तर आपल्या नशीबात जितका पैसा येणं आहे तितका आपोआप येणार. असं म्हटलं तर मग माणसांचही तसंच असलं पाहिजे. तसंच, आपण आपलं नशीब स्वतः घडवतो यावर ज्यांची श्रद्धा आहे ते म्हणतील कि आपल्या आयुष्यातील माणसं कोण व किती हे जसं आपण ठरवतो तसंच किती पैसे येणार हेही आपल्याच हातात आहे.  माणसं खरंच कमवता येतात का? जे कमवतो त्यावर आपला संपूर्ण अधिकार असतो. म्हणूनच आपण पैशांचा विनियोग करु शकतो. माणसं, अगदी दिवसाला एक या प्रमाणे जरी जोडली तरी माणसांवर आपला अधिकार नाही हे मुळात समजून घेण्याची गरज आहे. केवळ ती माणसं आपल्या नात्याची आहेत, परिचयाची आहेत का आपले मित्र आहेत म्हणून आपण अपेक्षा ठेवतो मात्र त्यांच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. पैसे आणि माणसं याला आपापलं महत्वाचं स्थान आहे. य