अनुभूती...

सर सलामत तो पगडी पचास' अशी म्हण आहे...खरं तर अजून एक म्हण प्रचलित व्हायला हवी... 'मन सलामत तो पगडी पचास' .... उद्या दहा ऑकटोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस..या अनुषंगाने काही सुचलं, ते शेअर करते. मन' असं म्हटलं की त्याला अनेक पैलू ,अनेक अर्थ, अनेक परिभाषा आहेत. पण हे मन नावाचं जे काही आपल्यापाशी आहे, ते सतत कार्यरत राहतं ते कशाच्या जोरावर? तर अनुभवांच्या...आपल्या समोर जे घडतंय..त्याला आपण काहीतरी प्रतिसाद देत असतो . त्यातूनच मन कार्यरत राहत.. अनुभव घेत राहून मन कार्यरत नक्की राहील. पण मानवी मनाची कक्षा इथपर्यंत मर्यादित नाही. आपण केवळ अनुभव घेत राहिलो तर एकावर एक असे नुसते थर साचत राहतील. मिळलेल्या अनुभवाचा विनियोग करायची वेळ येईल तेव्हा यातला नेमका कुठला, कधी आणि कसा वापरायचा हे समजणारच नाही.. मग नेमकं काय घडलं पाहिजे? तर अनुभव हा ,अनुभूती पर्यंत पोहोचतोय का यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अनुभूती ची माझी व्याख्या हि अशी.. 'ज्ञानदायी अनुभव म्हणजे अनुभूती' ...ज्या अनुभवातून आपल्याला ज्ञान होतं ,ती अनुभूती.. ज्ञान...माहिती नव्हे... अशाच अनुभूतींच्य...