पाणीपुरी
कधी कधी खूप अस्वस्थ वाटतं नाही का आपल्याला?...त्या जाहिराती लागत पूर्वी.."मै बहोत उदास था' ...तसं काहीसं.. आणि ..त्याच जाहिरातींमध्ये "और फिर मुझे मिला एक जादुई इलाज' ....असं ती लोकं म्हणत आणि प्रॉडक्ट दाखवत... ते इंग्रजी लोकांवरती केलेलं हिंदी डबिंग बघताना फार हसू यायचं 😃...पण.. इथे मुद्दा तो नाही.. मुद्दा हा आहे कि अस्वस्थ वाटतं ..ताण येतो.. मग करायचं काय.. तर दोस्त हो ..एक जालीम उपाय इथे या ठिकाणी मिळालेला आहे. .झोप हा उपाय आहेच..पण तीही कमालीची शांत लागावी या करता त्या अगोदरच नको का स्ट्रेस निघायला!..किमान थोडा तरी. त्या करता एक भन्नाट उपाय सापडला मला.. 'पाणी पुरी' ...पाणी पुरी ला आपण गोल गप्पा, पुचका इत्यादी शब्दांनी ओळखतोच. पण आज मी त्याचा इतिहास सांगणार नाहीये, तो जाणकारांनी सांगावा.. तर पाणी पुरी मुळे आपला स्ट्रेस रिलीझ होतो.. कमालीचा.. शंभर गोष्टी चालतात ओ डोक्यात.. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे जणू आपल्याकडे पर्मनंट भाडेकरू.. उध्या-संज्या सारखे..भाडंही देत नाहीत आणि जातही नाहीत डोक्यातून...डोक्यात जातात उलटं...वर्तमानकाळात जागायचं कसं या