Posts

Showing posts from January, 2023

पाणीपुरी

Image
  कधी कधी खूप अस्वस्थ वाटतं नाही का आपल्याला?...त्या जाहिराती लागत पूर्वी.."मै बहोत उदास था' ...तसं काहीसं.. आणि ..त्याच जाहिरातींमध्ये "और फिर मुझे मिला एक जादुई इलाज' ....असं ती लोकं म्हणत आणि प्रॉडक्ट दाखवत... ते इंग्रजी लोकांवरती केलेलं हिंदी डबिंग बघताना फार हसू यायचं 😃...पण.. इथे मुद्दा तो नाही.. मुद्दा हा आहे कि अस्वस्थ वाटतं ..ताण येतो.. मग करायचं काय.. तर दोस्त हो ..एक जालीम उपाय इथे या ठिकाणी मिळालेला आहे. .झोप हा उपाय आहेच..पण तीही कमालीची शांत लागावी या करता त्या अगोदरच नको का स्ट्रेस निघायला!..किमान थोडा तरी. त्या करता एक भन्नाट उपाय सापडला मला.. 'पाणी पुरी'  ...पाणी पुरी ला आपण गोल गप्पा, पुचका इत्यादी शब्दांनी ओळखतोच. पण आज मी त्याचा इतिहास सांगणार नाहीये, तो जाणकारांनी सांगावा..  तर पाणी पुरी मुळे आपला स्ट्रेस रिलीझ होतो.. कमालीचा..  शंभर गोष्टी चालतात ओ डोक्यात.. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे जणू आपल्याकडे पर्मनंट भाडेकरू.. उध्या-संज्या सारखे..भाडंही देत नाहीत आणि जातही नाहीत डोक्यातून...डोक्यात जातात उलटं...वर्तमानकाळात जागायचं कसं या

कुटुंब...

Image
आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास 'प्रपंच' हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. विभक्त कुटुंब पद्धत प्रचलित असताना ,प्रतिमा कुलकर्णी यांनी देशमुख कुटुंबाशी परिचय करून दिला.. श्रीधर देशमुख यांचं हे एकत्र कुटुंब... मुलं , सुना , नातवंड असे सगळे गुण्या गोविंदाने नांदणारे... एकमेवर इतका जीव कि कोण कुणाचं मूल हेही कळू नये.. आई वडिलांपेक्षा काका काकू जवळचे...आजी आजोबा जणू मित्रच नातवंडांचे...एकमेकांचा खंबीर आधार, मात्र उगाच कुणाच्याही आयुष्यात लुडबुड नाही.. समुद्रकाठी असलेला 'आश्रय' बंगला दिसला कि रवींद्र साठेंचे स्वर कानावर पडायचे आणि मग घराच्या आत डोकावता यायचं. मालिका सुरु करण्याची हि पद्धतच मला फार आवडायची...एक आल्हाददायक वातावरण निर्माण व्हायचं.. समस्या कुठल्या कुटुंबात नसतात? मात्र समस्या सुटतात हा विश्वास, हे सुरवातीचे स्वर निर्माण करायचे.. त्यामुळे मलिका पाहताना कधीही नकारार्थी वाटलं नाही. मालिकेत ब-याच ठिकाणी पार्श्वसंगीतात केवळ तानपुऱ्याचे स्वर ऐकू येतात..सहज साधे सोपे संवाद, झोपाळ्यावर बसलेलं असतानाचे, खोलीतले किंवा वऱ्हांड्य