Posts

Showing posts from November, 2019

26/11...

Image
  रोजच्या सारखाच दिवस उजाडला होता त्या सकाळी सुद्धा..अगदी नेहमीप्रमाणे  सुरू होणारा एक बुधवार..कुणाला ठाऊक होतं काय वाढून ठेवलंय पुढे? 26/11 ला आज 11 वर्ष लोटली असतील, गुन्हेगारांना शिक्षाही झाली असेल..मात्र वरून खपली धरलेली असली तरीही मनावरच्या जखमा अजूनही ओल्या च आहेत..    अलिकडे  निवृत्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री.रमेश महाले, 26/11 हल्ल्यांचे मुख्य तपास अधिकारी यांनी लिहिलेलं 'कसाब आणि मी' वाचलं..     26/11 चा भीषण नरसंहार, त्यामागचं कारस्थान, तपास, सूत्र, पुरावे, साक्षीदार ई सर्वकाही या पुस्तकात विस्तृत लिहिलंय..वास्तव खरोखरंच एवढं भयानक असू शकतं यावर विश्वास बसत नाही.     पोलीस म्हणजे सरकारी नोकर, दिलेलं काम तेवढं करणार असा आपला समज असतो..हे पुस्तक वाचून मात्र पोलीस खात्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला..     गुन्हा काय घडलाय, कुठे घडलाय याच्या कायदेशीर कारवाया जसं पोलीस करतात , तसंच गुन्हेगार, त्याची मानसिकता, गुन्ह्याकडे काय दृष्टीने पाहिलं पाहिजे, त्यानुसार तपास करणं ही महत्वाची कामगिरी सुद्धा पोलिसांना बजावावी लागते.. ...

गगन भरारी

Image
'Dream is not what you see in sleep, Dream is something which does not let you sleep..'  माजी राष्ट्रपती व जेष्ठ शास्त्रज्ञ भारत रत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे हे अनमोल शब्द...स्वत:चं आयुष्य आणि देशाचं भविष्य घडवण्याचा कानमंत्र म्हणून हे त्यांनी कायम जपलं.. त्यांच्या झोपेचा ताबा घेतलेलं एक स्वप्न म्हणजे भारतीय अंतराळ कार्याची (Indian space program) सुरुवात..भारताचं पहिलं रॉकेट अवकाशात झेप घेण्याच्या तयारीत होतं..डॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली त्रिवेंद्रम येथील थुंबा गावातील चर्च ची निवड करण्यात आली कारण शास्त्रीय दृष्ट्या हे ठिकाण पृथ्वीच्या विषुववृत्तावर (equator) होतं.. यासाठी चर्च च्या bishop महोदयांची परवानगी मागण्यासाठी ही जेष्ठ तज्ञ मंडळी गेली..नेमकं हो किंवा नाही मध्ये उत्तर देण्यापेक्षा बिशप महोदयांनी त्यांना रविवारी मास साठी येण्याचा आग्रह केला.. त्यावेळी बिशप जे म्हणाले ते केवळ वाचण्याजोगेच नव्हे तर जतन करण्याजोगे आहे..डॉ.कलाम यांच्या Ignited Minds:  Unleashing The Power Within India. या पुस्तकातला हा परिच्छेद.. My children, I have a famo...

कल्हई

Image
काळ बदलला..माणसं बदलली..माणसांच्या गरजा बदलल्या...सोयीची संकल्पना सुद्धा बदलली..पर्याय उपलब्ध झाले.. अगदी दैनंदिन आयुष्यातल्या वस्तू पहा..स्वयंपाकघरातली भांडी..स्टील किंवा, अल्यूमिनियम ,प्लास्टिक, मेलामाईन ई. येण्यापूर्वी पितळ हा धातू सर्रास वापरला जात असे..किंवा मातीची, तांब्याची भांडी सुद्धा..आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही भांडी अतिशय योग्य असत..आणि मुळात तेव्हा पर्याय उपलब्धही नव्हते त्यामुळे या भांड्यांची निगा राखणं हे routine असायचं..त्यासाठी वेगळा वेळ काढायला लागायचा नाही.. या मधे पितळ्याच्या भांड्यांची कल्हई हे एक महत्वाचं काम..काल आमच्या सोसायटीत असेच एक कल्हईकार आलेले..कल्हई कशी करतात हे बघण्याची माझी पहिलीच वेळ.. कल्हई म्हणजे तांब्याच्या वा पितळेच्या भांड्यांना आतल्या बाजूने कथलाचा पातळ थर देण्याची प्रक्रिया आहे...या भांड्यात जास्त काळ ठेवलेला, विशेषतः आंबट पदार्थ भांड्याच्या धातूशी प्रक्रिया होउन खराब होऊ नये म्हणून त्याला कल्हई केली जाते..(सौजन्य : गूगल ) हे बघत असताना सुचलं, अशीच कल्हई आपण स्वत:ला सुद्धा करून घेण्याची गरज आहे का? याचा...