दुर्गराज

'रायगड'...'गडांचा राजा, राजांचा गड'..
अशी ही मायभूमी 'रायगड' आपले आराध्य
राजे शिवछत्रपतींची राजधानी पाहण्याचा बेत ठरला..गडावरंच रहाण्याची सोय झालीच होती..
आधी राजमाता जाजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले..मात्र गड चढून जाण्याचा विचारही शिवला नव्हता..आपण आपलं ropeway मार्गी जाऊया म्हटलं..त्यानुसार थोडंफार सामान घेऊन निघालो..रविवार असल्यमुळे ropeway ला 6 तास waiting..काय करावं सुचेना इतक्यात एक बोरं विकणा-या आजी भेटल्या..म्हणाल्या अहो कुठे थांबता..जा चढत...2 तासात पोहोचाल..या मी shortcut दाखवते..500 पाय-या वाचवते..(ही बहुदा त्यांची tag line असावी..जाता येता सगळ्यांना हेच सांगत होत्या)
  थोडा विचार केला..म्हटलं आपल्या workout चा उपयोग करून घेण्याची हीच ती वेळ...पायात sports shoes नसले तरी floaters होते..पाठीवर sacks आणि एक handbag..महाराजांचं नाव घेतलं आणि सुरूवात केली..short cut पूर्ण माती आणि खडकांचा..एक दगड रोवलेला तर  दुसरा ठिसूळ..एकदा तर माझा एक पाय सटकला तेव्हा 'हिरकणी' ची गोष्ट आठवली..श्वासही अडकल्यासारखा अनुभव आला..पण थोडं बसल्यावर बरं वाटलं..सचिन सोबत असल्यामुळे आणि त्याने boost केल्यामुळे पुन्हा ऊठून सुरूवात केली..मधेच गाढवांचा कळप खाली येऊ लागला..रस्ता चिंचोळा..तिथेच बाजुला दगड धरून उभे आम्ही..असं thrill पहिल्यांदाच अनुभवलं...बाजी पासलकरांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी स्वराज्य स्थापनेपूर्वी सह्याद्रीशी मैत्री का केली असेल याचा अर्थ लागला..
  1575 पाय-यांपैकी 500 पाय-या या रस्त्यामुळे वाचल्या..पण तेव्हाच समजलं..घरात बसून रायगडाबद्दल वाचणं..आणि प्रत्यक्ष तो चढणं..जमीन आसमानचा फरक..राहिलेल्या पाय-या असल्यामुळे थोडं सोपं जाईल असं वाटलेलं..महाराजांना डोळ्यापुढे ठेवलं..त्यांचे परिश्रम आठवले..त्याच्यापुढे  आपण कोण? आपल्या राजांचा रायगड चढताही येऊ नये? शरम वाटली..पण हुरूप आला..
   पण सह्याद्री हा आईच जणू...तो आपल्याला सांभाळूनच घेतो..100 पाय-या चढून मग बसायचं..मात्र दर वेळी पुढल्या 100 पाय-या चढण्याचं बंळ आपोआप यायचं..असं करत करत..वाटेत भरपूर ताक..कोकम सरबत..लिंबू सरबत घेत..हा गडांचा राजा चढ़ून 3 तासात पूर्ण केला..
   शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' तील वाक्य आठवलं..ते लिहितात..''सह्याद्रीच्या पोटात जेवढा ज्वालामुखी..तेवढीच माया, म्हणूनच आपल्या अंगाखांद्यावर खेळणा-या आपल्या लेकरांना केवळ तहानच लागावी..भूक लागू नये.." खरंच..केवळ तहान लागून भागत होती..मात्र भूक अजिबात लागली नाही..
    ..गडावरच मुक्काम असल्यामुळे जास्तीत जास्तं वेळ महाराजांच्या सान्निध्यात आहोत असं वाटलं..आमच्याकडून जणूकाही महाराजांनी गड चढवून घेतला..सह्याद्रीशी संवाद साधत गड चढण्यात जी मजा आहे ..जो अनुभव आहे तो अविस्मरणीय..आणि आम्ही मुळीच pre planned नसल्यामुळे, चढायला जी मजा आली ती वेगळीच..
    रायगडाचे वारेच वेगळे..वर गेल्यावर आपण नतमस्तक होणारच..या वा-यांचा अनुभव घेता यावा..या vibes मिळाव्या यासाठी रायगड पाहण्याची इच्छा होती..
    महारांच्या समाधीपुढे नतमस्तक होताना डोळे पाणावले..वाटलं म्हणावं महाराज आपण परत यावे..परत जन्म घ्यावा..ब्रिटीश काळात गड किल्ल्यांची प्रचंड नासधूस केली गेली मात्र कुणीही तटबंदी मोडू शकलं नाही..महाराज याच अशाच तटबंदी सारखे..अभेद्य...
    कुणी कितीही नासधूस केली तरी आमचे महाराज ते आमच्यापासून हिरावून घेऊच शकत नाही..ते रायगडावर कायम जीवंत राहणार आहेत..सह्याद्रीत जीवंत राहणार आहेत..

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....