Posts

Showing posts from January, 2020

वाढदिवस

Image
किती गमतिशीर शब्द आहे हा..'वाढदिवस'..वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण एकमेकांना.. खरं तर हा आपला जन्म दिन म्हणून त्याची आठवण काढून आपण एक दिवस स्वत:ला साजरं करतो..तसं बघायला गेलं तर  वाढदिवस म्हणजे आयुष्यातून एक दिवस वजा..मग का बरं साजरा करायचा हा दिवस? वाढदिवस असा शब्द का बरं? काय वाढतं? फक्त वय? ते तर नैसर्गिक झालं..देवाच्या कृपेने आपण त्या दिवशी जीवंत असतो म्हणून आपण म्हणू शकतो की वय एका वर्षाने वाढलं.. मग विचार याचा करायला हवा की वाढायला काय हवं..?   वाढायला हवी ती प्रगल्भता..सकारात्मक विचार करायची..विचार मंथन करायची..आत्मपरीक्षण करायची..थोडक्यात स्वत:चं audit करायची..मानसिक, शारीरिक आणि आर्थिकही..   आणि हे सगळं केलं तरंच पुढला वाढदिवस..पुढली वाढ..पुढली प्रगल्भता साधता येणार..   एक एक वर्षाचं contract च केलं तर स्वत:शी? म्हणजे बघा हां..आपण सगळ्या पातळ्यांवर खरे उतरतोय का असा report तयार करायचा..कुठे कमी पडलो त्याची वेगळी यादी करायची आणि या वर्षात त्यावर काम करू असं आश्वस्त करायचं स्वत:ला..किती मजा येईल बघा..   कशाला कुणाशी स्पर्धा करा..आपली प्रगती ...

एकांत

Image
 प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा... 'एकांत'...आपल्याला कितीही मित्र असले तरी या मित्रा सारखा कुणी नाही..सततच्या गलक्यात..गर्दीतून मग ती विचारांची असो किंवा माणसांची..त्यापासून लांब जाऊन या मित्राला कधी भेटता येतंय याची आपण आतुरटेने वाट पाहत असतो..  एकटेपणा आणि एकांत यात खूप फरक आहे बरं का..एकटेपणा कंटाळवाणा असतो तर एकांताची आपल्याला गरज असते..एकांतात माणुस आत्मपरीक्षण करू शकतो..आपली कृती..आपले विचार पारखून बघू शकतो..म्हणूनच हा एकांत नावाचा मित्र भेटला की त्याच्याशी आपण मोकळा संवाद साधू शकतो..   हा आपल्याला माहिती असलेला अर्थ..तोही तितकाच महत्वाचा..आज या शब्दाचा खरा अर्थ वाचला..'एक' म्हणजे आपण..'मी'...या 'मी' ची आपल्याला जाणीवही नसते जेव्हा आपण जन्म घेतो..नंतर आपल्याला एक नाव दिले जाते..आपल्यावर संस्कार घडतात..आणि आपण जे काही करतो त्याला आपण म्हणतो हे 'मी' केले..आणि याचे रूपांतर अहंपणात होते..आपण हे विसरून जातो की इथे या निर्गुण निराकारची सत्ता..त्याच्या समोर आपण फक्त एक घटक..   हा अहंभाव असलेला 'मी' 'एक'...त्याचा अंत होणे म्हणजे...

शिवथर घळ

Image
गडांचा राजा 'रायगड' पाहून दुस-या दिवशी खाली आलो..येताना ropeway चा वापर केला..तेवढाच हाही अनुभव मिळावा..अवघ्या 4 मिंटात खाली..विज्ञानाची खरंच कमाल आहे..अर्थात गड चढून जाण्याप्रमाणे उतरून येण्याची मजा वेगळीच..पण पुढलं destination लौकर गाठता यावं यासाठी वेळ वाचावा हा प्रयत्न..   अलिकडे श्री सद्गुरू यांचा एक छान विचार वाचला..त्यांच्याच श्ब्दात इथे लिहिते..'Do not go in search of a Guru...when the pain of ignorance within you becomes a scream,  a Guru will come in search of you'...    थोडक्यात गुरू भेट घडते ती योग्यवेळ आल्यावर..अशाच योग्य समयी महाराजांना भेटले ,ते त्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी.. 1653 च्या सुमारास वरंधा घाटातील शिवथर येथील एका काळोख्या गुहेत कुबडीवर रेलून..दीपप्रकाशात एक अत्यंत तेजस्वी सत्पुरूष कर्मयोगाचे तत्वज्ञान ओवीबद्ध करण्यात मग्न झाले होते...समर्थ रामदास स्वामी!! त्यांच्या कठोर साधनेतून 'दासबोध' याच शिवथरघळीत उदयास आले..      'शिवथरघळ' हेच ठिकाण समर्थांनी का निवडले असा एक संदर्भ काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला..तो असा की ही जगा...