Posts

Showing posts from February, 2022

झोप आणि तिचे प्रकार..

Image
आज मराठी भाषा गौरव दिवस ..तेव्हा म्हटलं मराठीत तर आपण लिहितोच मग सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आज लिहावं...झोsssssपsss..कसं बरं वाटलं कि नाही वाचून..? या विषयावर लिहिण्याचा विचार येताच जांभया यायला लागल्या बघा. मला खात्री आहे ,वाचकांना सुद्धा हाच अनुभव शीर्षक वाचताच येऊ लागेल.. विचार केला तर काय कमालीचा प्रकार आहे ही झोप...!!! संपूर्ण निद्रिस्त व्हायचं , डोळे मिटायचे, संपूर्णपणे आपल्या विश्वात जायचं , सगळ्या जगाचा विसर पडू द्यायचा.    थेट काही एक वेळाने पूर्ण ताजं तवानं जागं व्हायचं. देवाने एवढं काही निर्माण करून ठेवलंय पण त्यापैकी सर्वात अद्भुत मला झोप वाटते. अजून एक म्हणजे ती निसर्गाचीच हाक म्हणायची इतर विधींप्रमाणे त्यामुळे ती सुद्धा कधीही येऊ शकते हे विशेष.     तर अशी ही झोप , हिचे प्रकार कुठले?याच्याही आधले मधले प्रकार असणार हे नक्की..     रात्रीची झोप: ही झोप आपण सर्वच घेतो. थोडक्यात आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे रात्रीची झोप. हल्लीच्या ट्रेंड प्रमाणे रात्री कितीही कुणी ओटिटी बघत बसलं तरी एका पॉईंट ला निद्रादेवी तिचा अधिकार दाखवते. साधारणतः ७ वाजल

चांदनी...

Image
  चंद्रला जितकं महत्व, तो जितका हवा हवासा तितकीच चांदणी..चंद्राकडे लक्ष गेलं आणि चांदणी कडे नाही असं होणार नाही. या चांदणी चं सुद्धा असंच होतं     चार वर्षांपूर्वी अचानक सकाळी बातमी येऊन धडकलेली, श्रीदेवी गेली ..आणि ती सुद्धा अशी विचित्रपणे..आणि इतक्या लौकर..वेळ आली की हे लौकर उशिरा म्हणण्याला काही अर्थ उरत नाही खरा, तरी श्रीदेवी गेली हे पचनीच पडेना तेव्हा.  तिची एक मुलाखत ऐकल्याचं आठवतंय. एकूण बालपण, शिक्षण ,अभिनयात पदार्पण असे नेहमीचे प्रश्न विचारले जात होते तिला. एक वाक्य ऐकून मात्र मी भारावून गेले. ती म्हणाली मी वयाच्या चौथ्या वर्षापासून सिनेमात काम करू लागले. शाळेत जायला कधी वेळ मिळाला नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून डिग्री घेणं वगैरे काय असतं , शाळा कॉलेज काय असतं हे मला माहितीच नाही.  एका हॉटेलात आई वडिलांसोबत आली असता चार वर्षांचा या मुलीला कुणी एक दिग्दर्शक डान्स करताना बघतो काय, सिनेमासाठी तिला निवडतो काय..घरून तिला प्रोत्साहन मिळत काय.. बाल कलाकार म्हणून तिची सुरुवात होते काय..and the rest is history... अभिनय म्हणजे काय हे कळत नसलेल्या वयात अभिनेत्री म्हणून य

मृत्यूचा सोहळा

Image
  मृत्यू' या एकमेव शब्दापाशी आपलं आयुष्य घुटमळत असतं..जगण्याचा विचार किती करतो आपण? कमीच करतो खरं..मरणाचा विचार जास्त करतो. 'काही झालं तर?' हा विचार करणारी जमात एकीकडे तर 'काही होत नाही', असा परस्पर विरोधी विचार करणारे दुसरीकडे.. पण सगळ्याच्या मुळाशी एकच...मृत्यू... खरं तर जगणंच महाकठीण, मृत्यू सोपा..एका क्षणात सगळं थांबतं...जाणाऱ्यापाशी काही उरत नाहीच..आपण जातो.. ४ ओळखीतली माणसं येतात..सगळं उरकलं जातं ..सगळे घरी जातात... मात्र, मी काय काम केलंय याचा जेव्हा विसर पडतो तेव्हाच मृत्यू होतो. प्रश्न हा आहे की जाणारा काय देऊन गेलाय ..जे असं काही देऊन गेले आहेत, त्याचा मृत्यू हा दुःखद होऊच शकत नाही, कारण केवळ देह रुपानेच ते आपल्यात नसतात. इतरांचं 'जगणं' हे खरंच 'जगणं' व्हावं असं काहीतरी एखाद्या कडून त्याच्याही नकळत होतं..अशी अद्वितीय व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा त्यांच्या मृत्यूचा होतो तो सोहळा.. लता बाई निवर्तल्या..यावर अजूनही विश्वास बसत नाही. बसूच नये..कारण लता बाईंचा अजरामर ठेवा आपल्यापाशी आहे ..त्या स्वतः रित्या गेल्या...मात्र आपल्यासारख्यांच