Posts

Showing posts from March, 2020

संधी

Image
   या अशा परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल असं कुणाला कधीही वाटलं नसेल..पूर्वी साथीचे रोग यायचे. मात्र औषधोपचाराअभावी आणि पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यात लोकांना जीव गमवावा लागायचा असं फक्त ऐकलेलं..    पण आज विज्ञानाची एवढी प्रगती झालेली असताना सुद्धा 2020 मधे आपल्याला या संकटाला तोंड द्यावं लागतंय..."छे ओ, पूर्वी रोगांची साथ यायची..तेव्हा मरायचे लोक..आता असं होत नाही" या आपल्या over confidence ला एक सणसणीत चपराक निसर्गाने दिली..    एवढंच नव्हे तर 'मी मोठा तू लहान'..'माझा देश छान' 'तुझा नाही'..आम्ही जास्तं भारी तुम्ही नाही वगैरे सगळ्यावरून आपण धाडकन खाली आपटलो आहोत..आज अक्खं जग locked down आहे..कुणाचं जास्तं आर्थिक नुकसान झालंय तर कुणाचं कमी..पण नुकसान सगळ्यांचं झालंय हे नक्की..आज आपल्या जाती धर्मांचे फक्त कागद उरलेत..कुणी हिंदू नाही, मुसल्मान नाही, मराठा नाही.. आपण फक्त आणि फक्त भारतीय आहोत..    आज आपण सगळे एकाच बोटीतले प्रवासी झालेलो आहोत..बोट बुडण्याच्या मार्गावर असताना ती वाचावी या करता सहप्रवासी म्हणून आपल्याला ज...

Good vibes only

Image
  10 वर्षांपूर्वी चं चक्र पुन्हा फिरलं..तेव्हा स्वाइन फ्लू  आणि आत्ता कोरोना...सद्ध्या कोरोना व्हायरस ला जितकी publicity मिळते आहे तितकी क्वचितच कुणा जिवाला मिळाली असेल पृथ्वीतलावर..हो..तो सुद्धा जीवच शेवटी..तो म्हणत असेल की आता आलोय त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे..जसा एखादा परदेशी पाहुणा इथे आला की म्हणेल..मिम्स म्हणू नका..जोक म्हणू नका...animations म्हणू नका..आणि असे काही साथीचे रोग आले आपल्या इथे की प्रत्येक माणसातला एक सूप्त डॉक्टर जागा होतो..आपल्या अल्पमतीने प्रत्येक जण उपाय सुचवत बसतो..खिशात कापूर ठेवा..कानात निलगिरीत बुडवलेला कापसाचा बोळा ठेवा..उपायांचं थैमानच जणू..आणि हे असे forwards वाचून लोकांमधे एकच गोंधळ उडतो..कालपर्यंत ठणठणीत असलेले आपण अचानक आजारपणाच्या..किंबहुना मरणाच्या भितीने ग्रासले जातो..    सतत एकच एक वाचून, ऐकून, त्या बद्दल बोलून आपण फक्त नकारात्मकता पसरवतो आहोत..सगळीकडे भिती, संशय, किळस पसरते आणि यातूनच रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे..त्यामुळे सकारात्मक विचार ही या परिस्थितीशी लढा देण्याची पहिली पायरी..आपण पूर्णत: शारीरिक आ...

भूमिका

Image
  आजी आजोबा हे नातवंडांचे सवंगडीच असतात नाही का? कशी गंमत असते..खरं तर ते आपल्या काही पीढ्या आधीचे..मात्र जे आपल्या आई बाबांनाही जमत नाही ते त्यांना एखादी जादू केल्याप्रमाणे जमतं..आजी आजोबा आपल्या वयाचे होऊन खेळतात..अगदी तासंतास..आई बाबांना समजावता येत नाही ते समजावतात.  खरं तर आजी आजोबांचं काम जास्तं कठीण..त्यांना त्यांच्या मुलांनाही सांभाळून घ्यायचंय आणि नातवंडांनासुद्धा..पण हे सगळं ते अगदी लीलया करत असतात..या भूमिका अगदी सहज निभावत असतात..    हे आठवण्याचं कारण म्हणजे अलिकडे मी माझ्या आजोबांना भेटायला गेले..त्यांचं वास्तव्य मुंबईत असल्यामुळे वरचेवर भेट होऊ शकत नाही याचं नेहमी वाईट वाटतं मला..आजोबांचं वय 93..तब्ब्येत तशी कायमच ठणठणीत..अलिकडे वयोमानामुळे काही किरकोळ तक्रारी जरी होत असल्या तरी आजोबा नेहमीच त्यातून पूर्ण बरे होतात..    व्यवस्थित जेवण जात नसल्यामुळे या वेळी आजोबा बरेच बारीक झालेले दिसले..मी त्यांच्या शेजारी बसले आणि म्हणाले,"आजोबा,जेवताय ना व्यवस्थित?..भूक लागते ना? भूक मारू नका..व्यवस्थित जेवा..जेवला नाहीत तर अशक्तपणा येईल..सगळं जेवत जा.....

'आई' जन्म घेते....

Image
अलिकडे  माझ्या आईच्या तोंडी ब-याचदा हे वाक्य ऐकायला मिळतं ,"अगं आता म्हातारी झाली आई तुझी"..माझ्याच काय, माझ्या वयाच्या सगळ्याच मुलींच्या आया हे म्हणतात..    वय होतं हे नक्की..ते तर सगळ्यांचं वाढतं..मग सहजच एक विचार मनात आला..आई, ही आई केव्हा होते?..सूक्ष्म रूपात म्हणायचं तर बाळाची चाहुल लागते तेव्हा..आणि प्रत्यक्ष रूपात बाळ जन्माला येतं तेव्हा..आईपणाचा अनुभव नवीनच असतो तिच्यासाठी..आपल्या पोटी बाळ यावं यासाठीची शारीरिक आणि मानसिक तयारी तिला फार आधीपासून करावी लागते..याचाच अर्थ आई ही मूल जन्मायच्याही फार आधी जन्म घेते..     हेच वडिलांना लागू असतं..वास्तविक हे 'आई' तत्व वडिलांमधेही असतंच की..केवळ त्यांनी बाळाला गर्भात वाढवलेलं नाही म्हणून बाबा 'आई' नसतो असं म्हणणं किती चुकीचं ठरेल नाही का? जिथे बाळाची चाहूल लागताच 'आई' जन्म घेते तिथेच "बाबा' सुद्धा जन्म घेतो..बाबातलं 'आईपणही' जन्म घेतं.फक्त त्याची पूर्वतयारी,नियोजन वेगळं. पण तितकंच महत्वाचं..हे 'आई' तत्व लक्षात घेऊनच शीर्षक दिलं आहे. त्यामुळे आई बाबा असा भेदभाव नाहीच.     ...