संधी
या अशा परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल असं कुणाला कधीही वाटलं नसेल..पूर्वी साथीचे रोग यायचे. मात्र औषधोपचाराअभावी आणि पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यात लोकांना जीव गमवावा लागायचा असं फक्त ऐकलेलं..
पण आज विज्ञानाची एवढी प्रगती झालेली असताना सुद्धा 2020 मधे आपल्याला या संकटाला तोंड द्यावं लागतंय..."छे ओ, पूर्वी रोगांची साथ यायची..तेव्हा मरायचे लोक..आता असं होत नाही" या आपल्या over confidence ला एक सणसणीत चपराक निसर्गाने दिली..
एवढंच नव्हे तर 'मी मोठा तू लहान'..'माझा देश छान' 'तुझा नाही'..आम्ही जास्तं भारी तुम्ही नाही वगैरे सगळ्यावरून आपण धाडकन खाली आपटलो आहोत..आज अक्खं जग locked down आहे..कुणाचं जास्तं आर्थिक नुकसान झालंय तर कुणाचं कमी..पण नुकसान सगळ्यांचं झालंय हे नक्की..आज आपल्या जाती धर्मांचे फक्त कागद उरलेत..कुणी हिंदू नाही, मुसल्मान नाही, मराठा नाही.. आपण फक्त आणि फक्त भारतीय आहोत..
आज आपण सगळे एकाच बोटीतले प्रवासी झालेलो आहोत..बोट बुडण्याच्या मार्गावर असताना ती वाचावी या करता सहप्रवासी म्हणून आपल्याला जे काही ऊत्तम करता येईल..मग तो खारीचा प्रयत्न असला तरी चालेल पण तो झाला पाहिजे..बोड बुडत असताना स्वत: बरोबर इतरांना life jackets घालण्याचं कामंही आपण तितक्याच जबाबदारीने केलं पाहीजे..
आपल्या देशासाठी उपयोगाला येण्याची संधी म्हणून आपण या कडे पाहुया..आपला देश वाचला तर आपण वाचू आणि इतर गरजू राष्ट्रांना मदतीचा हातही देऊ शकू इतकी विलक्षण ताकद आपल्या देशाकडे आहे..त्यासाठी एकमेवाद्वितीय नेतृत्व आपल्या माननीय पंतप्रधानांच्या रूपाने आपल्याला लाभलं आहे हे आपल्या देशाचं भाग्य..
जनता कर्फ्यू च्या निमित्ताने देशभावनेची..एकतेची ज्योत आपल्यात निर्माण झाली..ही ज्योत अशीच तेवती ठेवुया..आज आपल्या देशा साठी एकजुटीने उभे राहुया..लोकांना देशासाठी रक्त संडावे लागले..हत्यारं उचलावी लागली..प्राणपणाला लावावे लागले..घरापासून वेगळे व्हावे लागले आहे..याच्या तुलनेमधे आपलं काम सोपं नाही का?
देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी रोज रोज मिळत नाही..आज घर बसल्या ती आपल्याला मिळाली आहे असं समजुया..आपल्या राष्ट्रप्रमुख आणि देशप्रमुखांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून ही लढाई जिंकण्याचा संकल्प करुया..नव्हे ही लढाई जिंकूनच दाखवुया..
पण आज विज्ञानाची एवढी प्रगती झालेली असताना सुद्धा 2020 मधे आपल्याला या संकटाला तोंड द्यावं लागतंय..."छे ओ, पूर्वी रोगांची साथ यायची..तेव्हा मरायचे लोक..आता असं होत नाही" या आपल्या over confidence ला एक सणसणीत चपराक निसर्गाने दिली..
एवढंच नव्हे तर 'मी मोठा तू लहान'..'माझा देश छान' 'तुझा नाही'..आम्ही जास्तं भारी तुम्ही नाही वगैरे सगळ्यावरून आपण धाडकन खाली आपटलो आहोत..आज अक्खं जग locked down आहे..कुणाचं जास्तं आर्थिक नुकसान झालंय तर कुणाचं कमी..पण नुकसान सगळ्यांचं झालंय हे नक्की..आज आपल्या जाती धर्मांचे फक्त कागद उरलेत..कुणी हिंदू नाही, मुसल्मान नाही, मराठा नाही.. आपण फक्त आणि फक्त भारतीय आहोत..
आज आपण सगळे एकाच बोटीतले प्रवासी झालेलो आहोत..बोट बुडण्याच्या मार्गावर असताना ती वाचावी या करता सहप्रवासी म्हणून आपल्याला जे काही ऊत्तम करता येईल..मग तो खारीचा प्रयत्न असला तरी चालेल पण तो झाला पाहिजे..बोड बुडत असताना स्वत: बरोबर इतरांना life jackets घालण्याचं कामंही आपण तितक्याच जबाबदारीने केलं पाहीजे..
आपल्या देशासाठी उपयोगाला येण्याची संधी म्हणून आपण या कडे पाहुया..आपला देश वाचला तर आपण वाचू आणि इतर गरजू राष्ट्रांना मदतीचा हातही देऊ शकू इतकी विलक्षण ताकद आपल्या देशाकडे आहे..त्यासाठी एकमेवाद्वितीय नेतृत्व आपल्या माननीय पंतप्रधानांच्या रूपाने आपल्याला लाभलं आहे हे आपल्या देशाचं भाग्य..
जनता कर्फ्यू च्या निमित्ताने देशभावनेची..एकतेची ज्योत आपल्यात निर्माण झाली..ही ज्योत अशीच तेवती ठेवुया..आज आपल्या देशा साठी एकजुटीने उभे राहुया..लोकांना देशासाठी रक्त संडावे लागले..हत्यारं उचलावी लागली..प्राणपणाला लावावे लागले..घरापासून वेगळे व्हावे लागले आहे..याच्या तुलनेमधे आपलं काम सोपं नाही का?
देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी रोज रोज मिळत नाही..आज घर बसल्या ती आपल्याला मिळाली आहे असं समजुया..आपल्या राष्ट्रप्रमुख आणि देशप्रमुखांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून ही लढाई जिंकण्याचा संकल्प करुया..नव्हे ही लढाई जिंकूनच दाखवुया..
Comments
Post a Comment