Good vibes only

 
10 वर्षांपूर्वी चं चक्र पुन्हा फिरलं..तेव्हा स्वाइन फ्लू  आणि आत्ता कोरोना...सद्ध्या कोरोना व्हायरस ला जितकी publicity मिळते आहे तितकी क्वचितच कुणा जिवाला मिळाली असेल पृथ्वीतलावर..हो..तो सुद्धा जीवच शेवटी..तो म्हणत असेल की आता आलोय त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे..जसा एखादा परदेशी पाहुणा इथे आला की म्हणेल..मिम्स म्हणू नका..जोक म्हणू नका...animations म्हणू नका..आणि असे काही साथीचे रोग आले आपल्या इथे की प्रत्येक माणसातला एक सूप्त डॉक्टर जागा होतो..आपल्या अल्पमतीने प्रत्येक जण उपाय सुचवत बसतो..खिशात कापूर ठेवा..कानात निलगिरीत बुडवलेला कापसाचा बोळा ठेवा..उपायांचं थैमानच जणू..आणि हे असे forwards वाचून लोकांमधे एकच गोंधळ उडतो..कालपर्यंत ठणठणीत असलेले आपण अचानक आजारपणाच्या..किंबहुना मरणाच्या भितीने ग्रासले जातो..
   सतत एकच एक वाचून, ऐकून, त्या बद्दल बोलून आपण फक्त नकारात्मकता पसरवतो आहोत..सगळीकडे भिती, संशय, किळस पसरते आणि यातूनच रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे..त्यामुळे सकारात्मक विचार ही या परिस्थितीशी लढा देण्याची पहिली पायरी..आपण पूर्णत: शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ आहोत असे आधी स्वत:ला आश्वस्त करणे आणि इतरांना सुद्धा..आपण एक सकारात्मक विचार दिला की तो पुढे पसरत जातो आणि अशाने आपण एक सकारात्मक साखळी तयार करतो..काळजी करत बसणे हा उपाय नसून काळजी घेणे हेच योग्य..
   ज्याची वेळ आली असेल तो जाणार..मग कोरोना काय किंवा अजून काय..ते फक्त निमित्त झाले..मात्र तहान लागली की विहीर खोदण्यापेक्षा जर का नियमित व्यायाम, परिपूर्ण आहार, सूर्यप्रकाश, पाणी, मोकळी हवा, स्व्चच्छतेच्या चांगल्या सवयी, योग्य विश्रांती आणि सकरात्मक विचारसरणीचा अवलंब असे सगळे घटक आपल्या जीवनात असतील तर कोरोनाच काय, कुठल्याही रोगाशी आपण दोन हात अगदी सहज करू शकतो..सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वत:ला तंदुरुस्त ठेवूनच निसर्गाचा समतोल राखू शकतो..
  अशा साथीचा भीषण परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो हे देखील अशावेळी जाणवते..हातावर पोट असलेल्या मंडळीं पासून ते व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांची अर्थव्यवस्था कोलमडते..सांसकृतिक कार्यक्रम, सिनेमा गृहे, नाट्यगृहे बंद म्हटल्यावर अर्थार्जनाचा एक प्रमुख स्रोत बंद होऊन कलाकार मंडळींना सर्वात जास्त फटका बसतो..पर्यटन व्यवसाय कोलमडतो..जे होणार ते होतंच..पण यातून धडा घेऊन आता आपलं उर्वरित आयुष्याकडे पाहण्याची गरज आहे..
  तेव्हा सर्वात आधी काय करुया तर तो सकारात्मक विचार..जगात कोरोना मुळे किती मेले याकडे पाहण्यापेक्षा किती लोकं सुखरूप बाहेर पडली याकडे लक्ष देऊया..त्यांची संख्या नक्की जास्तं आहे..कालच्यापेक्षा आज मी व माझे कुटुंब तंदुरुस्त आहे का याकडे लक्ष देऊया..आणि स्वत:मधला सूप्त डॉक्टर जागा होऊ न देता कुठल्याही प्रकारे भीती आणि काळजी पसरणार नाही याची दक्षता forwards पाठवताना घेऊया..
  अशानेच जगभरात good vibes पसरतील आणि जग रोगमुक्त होईल याची खात्री वाटते..

Photo credits: google

Comments

Popular posts from this blog

एका अंघोळीची गोष्ट

कल्हई

श्री स्वामी समर्थ..