Posts

Showing posts from January, 2022

दवबिंदू....

Image
 दवबिंदूचं मला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. आपल्या लहानशा अस्तित्वाच्या काळात तो किती डौलात चमकत असतो ! दररोज एक नवा बिंदू चमकताना दिसला कि किती प्रसन्न वाटतं. आपणही असेच असतो तर? दवबिंदू आणि लहान मुलं ही मला एकसारखी वाटतात नेहमी.    मोठं होणं म्हणजे नेमकं काय? समजूतदार होणं ? समजूतदार झालो असं म्हटलं तर आपण आपल्या आणि सर्वांच्या आवडीचे झालो असतो नाही का? पण होतं नेमकं उलटं ..मोठं झाल्यावर आपण स्वतःला आणि इतरांना आवडेनासे होतो ..लहान असताना अगदी 'अले अले' करत गोंजारणारी माणसं ढिगाने असतात. पण मोठे झालो की ,म्हणजेच समजूतदार झालो की असं कुणीही गोंजारत नाही आपल्याला.. मोठ्या होण्यातला समजूतदारपणा हाच असला पाहिजे की आधी आपण स्वतःला आवडतोय का? लहान मूल स्वतः स्वतःचा आनंद घेत असतं ..म्हणूनच ते सगळ्यांनाच आवडतं ..त्याला काय आणि किती कळत असेल ? हा आपला बाप, ही आई , हा अमका हा ढमका ...पण सगळे अगदी पायघड्या घालायला तयार असतात त्याच्यासाठी..याचं खरं कारण , माफ करा थोडं पठडी सोडून लिहितेय, पण ते मूल कुणाला 'घंटा' विचारत नसतं ..मला झोप आली मी झोपणार, मला वाटेल तेव्हा जेव्

5 मिनिटं..

Image
  लहानपणी मोठी गम्मत असते बरं ! मुलांचं आपलं आपलं वेगळं घड्याळ असतं. त्यांच्या परीने ते घड्याळ पुढे मागे करत असतात. पाच मिनिटांचा वेळ सुद्धा किती मजेशीर वेळ असतो लहानपणी..मला आठवतं शाळेसाठी आई मला सकाळी उठवायला यायची तेव्हा मी 5 मिं-5 मिं म्हणून अजून थोडी झोप काढायचे. पण ही 5 मिनिटं आईच्या भरोशावर असायची ..एवढा विश्वास तिच्यावर की ती 5 मिनिटांनी उठवायला नक्की येणार आणि आपल्याला शाळेला उशीर होणार नाही. आणि त्या शेवटच्या ५ मिनिटात जणू अवघ्या रात्रभराची झोप घेतल्याचं समाधान मिळायचं. विचार केला तर या 5 मिनिटांचं आजही तितकंच महत्व आहे की . अगदी आजही सकाळचा गजर वाजला की आपल्यापैकी 99 टक्के जणं तो snooze करून 5 मिनिटासाठी नक्की पुढे ढकलत असतात. काय होणार असतं असं या अजून 5 मिनिटांनी? पण ती शेवटचीच ५ मिनिटं जिवाभावाची वाटतात सगळ्यांना.  आपल्या जिवलगांना कितीही वेळ भेटलो, त्यांच्याशी कितीही वेळ गप्पा मारल्या तरी त्या शेवटच्या पाच मिनिटात गेल्या 5 तासांची कसर भरून निघते असं वाटतं . प्रियकर प्रेयसीची भेट,... अगदी तासंतास हातात हात घेऊन बसूनही अजून 5 मिनिटं थांबण्याचा लडिवाळ हट्ट काही

कहो ना..'आज भी'..प्यार है

Image
    14 जानेवरी 2000...जानेवरी महिना हा सर्वार्थाने आशावाद दाखवणारा महिना.. एकतर वर्षातला पहिला महिना..नवीन सुरुवात करायची उमेद आणि ऊर्जा देणारा म्हणून जानेवारी ओळखला जातो. बरं मग साल 2000 चं काय म्हणताय असं विचाराल मला.. तर हो ..१४ जानेवारी, साल 2000 या दिवशी हिंदी सिनेमा जगताला, थोडक्यात बॉलीवूड ला 'कहो ना प्यार है' सिनेमामुळे एक 'अजिंक्यतारा' मिळाला...हृतिक राकेश रोशन नावाचा.. म्हणून हा 2000 सालचा जानेवरी महिना खास! 'कहो ना प्यार है' आणि हृतिक रोशन या जणू एका नाण्याच्या 2 बाजू झाल्या..खान लोकांचं अधिराज्य असलेल्या बॉलीवूड मधे 6 फूट उंच, पिळदार शरीरयष्टी , घारे डोळे, चाफेकळी नाक व भन्नाट जाॅ लाईन असलेला एक तरुण पदार्पण करतो. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांचा नातू , दिग्दर्शक व अभिनेता राकेश रोशन यांचा मुलगा व सुप्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांचा पुतण्या या सगळ्या ओळखी जणू पुसल्या गेल्या आणि लक्षात राहिला तो फक्त हृतिक रोशन.   त्याच्या सोबत हिरोईन होती अमिषा पटेल..बॅरिस्टर रजनी पटेलांची नात बरं का ही! तशी उंचीने हृतिक पेक्षा खूपच बुटकी पण तिच्या चेहऱ्याच्

'The wall'...on the wall...आणि मी...

Image
  किती जादुई असतात नाही ही छायाचित्र! जुने फोटो आपल्याला आठवणींच्या विश्वात चटकन घेऊन जातात..लाखो क्षण, मिनिटे , तास,  दिवस तसंच कित्येक वर्षांचा काळ झपकन पार करवून आपल्याला मागे घेऊन जाण्याची ताकद असते बरं फोटो मधे!..मला तर जुने फोटो बघणं stress buster वाटतं ..फोटो बघत बसलं की आपण आपोआप त्यात रमतो, वेळ चांगला जातो आणि या सगळ्यात आपला ताण कधी हलका होतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही.. एक असाच आठवणीतला फोटो सापडला ..इयत्ता ६ वीत असतानाच्या या माझ्या फोटोत अजून एक फोटो आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला लाभलेला एक अद्वितीय खेळाडू असा त्याचा उल्लेख केला तर निश्चितच वावगं ठरणार नाही...चायना कडे जरूर त्यांची ग्रेट वॉल असेल मात्र आमची the great Indian wall, Mr. Dependable म्हणजे राहुल द्रविड. क्रिकेट बद्दलचं माझं ज्ञान अतिसामान्याहूनही अतिसामान्य आहे, मात्र एवढं नक्की ठाऊक की test player ला glamour मिळवून दिलं ते राहुल द्रविड ने. या फोटो मागची आठवण मोठी मजेशीर आहे. साल होतं १९९८, नाशिक.. राहुल द्रविड चं जबरदस्त fan following होतं माझं ..द्रविडचे फोटो गोळा करणं हा आवडता छंद..आई आणि मी ज्या

ओढ

Image
'ओढ'.. शब्दातच काहीतरी वेगळं आहे. शब्द उच्चारला तरी आपल्यापाशी काहीतरी खेचलं जातंय असं वाटतं मला. गंमत कशी असते बघा, ओढ हे सर्वनाम म्हणून वापरलं तर तितकं परिणामकारक होणार नाही मात्र ' ती ओढ' असं नाम या अर्थी वापरलं की जणू दुधावर साय धरावी तसं काहीसं मलईदार , मऊसूद वाटतं. ओढ लागून राहिली कि नेमक्या काय भावना असतात बरं? ती व्यक्ती आणि आपण यामध्ये एक अदृश्य धागा असतो. दोहोबाजुंनी हे धागे मजबूत बांधलेले असतात.  मात्र ताणून कुणीच धरत नाही. कारण दोघांनाही माहिती असतं कि आपल्यामध्ये आहे तो मायेचा धागा, ज्यावर फक्त मायेचा पदर सरकवला तरी तो घट्ट होत जाणारे. त्यासाठी कुणी एकाने ताणायची गरज नाही.  बरं ही ओढ निर्जीव वस्तूंबद्दल सुद्धा वाटतेच की...जसं की आपलं आवडतं पुस्तक , आपली बॅग , आपली गाडी इ. माझ्या गाडीवर तर माझा इतका जीव आहे की येता जाता मी तिला थँक यू म्हणते ," बाई गं , तू आहेस म्हणून मी जवळची , लांबची अंतरं किती सहज पार करू शकते".. कधी कधी माझं मलाच हसू येतं याचं ,पण गाडी सर्व्हिसिंग ला गेली की ती घरी येईपर्यंत मला अगदी बेचैन होत राहतं . कधी एकदा गाडी

रणवीर..

Image
    पूर्वी सारखी रणक्षेत्र आता राहिली नाहीत..पण कार्यक्षेत्रांचा विस्तार मात्र होताना दिसतोय. प्रत्येक क्षेत्राची आता रणभूमीच झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिथे एखादा 'रणवीर' च सातत्य टिकवतो. रणवीर सिंह भवनानी हा असाच एक वीर आहे असं म्हणावंसं वाटतं. हे लिहावंस वाटलं यामागे कारण म्हणजे अलिकडे पाहिलेला '83' हा चित्रपट . रणवीर पहिल्यांदा एखादी भूमिका उभी करतो ती नजरेतून. त्याचा चेहरा मेकअप लावून बदलतोच पण भूमिकेच्या खोलात शिरताना रणवीर डोळ्यातून अगदी भरभरून व्यक्त होत राहतो. कपिल देव उभा करताना प्रत्यक्ष कपिल देव यांची अनेकदा भेट घेऊन, त्यांची बोलण्याच्या , उठण्या-बसण्याच्या इ लकबी  त्याने पकडल्या आहेतच मात्र त्यांच्या डोळ्यांचा अभ्यासही अचूक केलाय हे समजतं. त्यामुळे चित्रपट पाहताना रणवीर बाजूला होऊन कपिल देव समोर उभे राहतात. स्वतः ४-५ तास दररोज क्रिकेट प्रॅक्टिस करणं , कमावलेलं शरीर उतरवून भूमिकेच्या जवळ आणणं या सगळ्या गोष्टींवर जीवापाड मेहनत रणवीर ने घेतलेली दिसून येते. कौतुक यासाठी करावंसं वाटलं की कपिल देवांची भेट घेणं शक्य असल्यामुळे या गोष्टी बऱ

३१ डिसेंबर आणि आळंदी...

Image
  आळंदी ला जायचा योग इतक्या वर्षांनी काल आला. ज्ञानेश्वर माऊलींच्या सान्निध्यात जाणं हा विचारच किती भारावून टाकणारा आहे. 'ज्ञानेश्वरी' लिहून तरुण वयात संजीवन समाधी घेणाऱ्याला मनुष्य तरी कसं म्हणायचं? . ते साक्षात परमेश्वर च...माऊलींनी जन्म घेतला ते 'ज्ञानेश्वरी' निर्मितीच्या माध्यमातून जीवनमूल्य समजावून देण्यासाठी. हजारो वर्षांपूर्वी कृष्णपरमात्म्याने गीता सांगितली. माउलींनी , चंदन उगाळल्यावर त्यातला सुगंध बाहेर पडावा तसाच, गीतेतील सुगंध 'ज्ञानेश्वरी' म्हणून आपल्या समोर आणला.       आळंदी ला जात असताना हे सगळं मनात येत होतं . काल आळंदीत गर्दी म्हणावी अशी फार नव्हती. समाधीचं दर्शनहि मिळालं खरं पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं. समाधान वाटेना.    निघताना वाटलं इंद्रायणीला नमस्कार करावा, पाय बुडवावे आणि निघावं. नंतर जाणवलं की इंद्रायणीत पाय बुडवणं हा अनुभव नव्हे तर अनुभूती आहे. इतका वेळ जे राहून गेल्यासारखं वाटत होतं ते इथे गवसलं. इंद्रायणीत पाय बुडवले, डोळे मिटले आणि प्रत्यक्ष माऊलींना पदस्पर्श होतोय असं वाटलं.  दोन मीं सगळ्याचाच विसर पडला. आपण क