Posts

Showing posts from April, 2022

निरागस हट्ट....(लघू कथा)

Image
१९९३ सालची गोष्ट...सरस्वती विद्यामंदिर शाळेत राजू दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. राजुचं संपूर्ण नाव प्रल्हाद राजेंद्र गोडबोले. नावामागची कथा अशी कि प्रल्हादच्या आजीने (आई ची आई) तिच्या लहानपणी म्हणे शाळेच्या नाटकात भक्त प्रल्हादाची भूमिका केलेली. तेव्हापासून त्या इतक्या भारावून गेलेल्या कि आपल्याला धाकट्या भावाचं नाव प्रल्हाद ठेवायचं असं त्यांनी ठरवलं होतं . पण तिला झाली धाकटी बहिण, त्यामुळे मग आपल्या मुलाचं नाव तरी प्रल्हाद ठेवूया अशी इच्छा होती .पण त्यांनाही दोघी मुलीच , त्यामुळे मोठ्या मुलीला जर का पहिला मुलगा झाला तर त्याचं नाव प्रल्हाद ठेवायचं असं म्हणे तिने सांगून ठेवलेलं. तर असा हा त्रेता युगातला प्रल्हाद कलियुगात आला तो गोडबोलेंच्या घरी. पण होता होता प्रल्हाद चा राजू झाला आणि सगळे त्याला लाडाच्या नावाने हाक मारू लागले. विष्णुभक्त नसला तरी हा प्रल्हाद प्राणी भक्त होता. हर तऱ्हेचे, हर जातीचे प्राणी त्याला आवडायचे. छोटे मोठे किडे , पाली , फुलपाखरं , सगळं त्याला खूप आवडायचं . त्यांच्याकडे बघत बसणं , त्यांच्या हालचालींचा निरीक्षण करणं . कधी पालीसारखं उलटं चालून बघणं , कधी आ

मोठेपण..

Image
कलाकाराला मोठेपण मिळण्याकरता तपश्चर्या करावी लागते..ते सहज साध्य नाही..मोठेपण मिळण्याकरता मात्र आयुष्यात अनेक ठिकाणी स्वतःच स्वतःला लहान होताना कलाकार पाहत असतो. कधी स्वतःच्या नजरेत कधी इतरांच्या. काहीजण त्याला सतत लहानपण देऊ पाहत असतात .अशावेळी कलाकाराची खरी परीक्षा असते . जग त्याला कितीही लहान करो, त्याने स्वतःच्या नजरेतून स्वतःला लहान करता काम नये. या अग्निदिव्यातून तालून सुलाखून जो निघतो आणि तरीही स्वतः लहान राहून कला मोठी करतो ,त्याच कलाकाराला मोठेपण मिळतं .. आज 'मी वसंतराव पाहताना हे सतत जाणवत होतं. जिथे सच्चे स्वर सापडतील ते संगीत आणि अशा सच्चा स्वरांचा शोध घेत असलेला एक ' अद्वितीय' कलाकार आपल्याला लाभला ते म्हणजे 'वसंतराव देशपांडे'. चाकोरीबद्ध गायकीत स्वतःला बंदिस्त न केल्यामुळेच कदाचित 'स्वर' त्यांना शोधत आले असावे. 'सा' लागला कि साक्षात परमेश्वर येऊन समोर उभा राहतो, त्याला शोधत मंदिरात जावं लागत नाही, हे मास्टर दीनानाथांच्या मुखी आलेलं चित्रपटातलं वाक्य अगदी खरं आहे. मात्र त्या परमेश्वरालाच मुक्तपणे प्रकट व्हायची इच्छा झाली असाव

श्री स्वामी समर्थ..

Image
2019 सालची गोष्ट ..आम्ही दोघांनी अक्कलकोट ला जायचं ठरवलं . एरवीच्या वेळापत्रकात आमच्या एकूण व्यवसायाचं स्वरूप बघता वर्षभरात जमलं नाही म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत जायचं ठरलं .  आमच्या घरी कशेळीकरांकडे स्वामींवर सगळ्यांची श्रद्धा,  विशेषतः माझ्या आजीची .त्यामुळे माझं नाव अक्कलकोट ला जाऊन ठेवावं अशी आजीची इच्छा होती. महिनाभराची असताना मला अक्कलकोट ला घेऊन जाऊन नाव ठेवलंय असं आई सांगते.  त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी माझा अक्कलकोट ला जाण्याचा योग 2019 च्या मे महिन्यात आला. भर उकाड्यात जाण्याचा बेत ठरलेला खरा पण प्रत्यक्ष अक्कलकोट ला जाऊन दर्शन घेण्याच्या इच्छेपुढे उकाडा तो कसला. सकाळी लौकर आवरून आम्ही दोघे, आमच्या चार चाकीतून निघालो. प्रवास एकूण छान सुरु झालेला. सोलापूर रस्त्याला लागलो तशी गाड्यांची रांग लागलेली दिसली. पुढे कुठेतरी तेल सांडल्यामुळे जबरदस्त अपघात झाला होता. एकूणच घडलेला प्रकार लक्षात आला . गाडी हळू हळू , कासव गतीने पुढे ढकलत होतो . या मागे बसण्यात काहीही अर्थ नव्हता हे एकूण लक्षात आलं. ठरल्याप्रमाणे अक्कलकोट ला पोहोचायचं असेल तर इथून बाहेर पडलं पाहिजे. मागे फिराव

एका अंघोळीची गोष्ट

Image
अंघोळ म्हटलं की मला सध्या एकच चित्र डोळ्यापुढे दिसतं ..जे कदाचित घरोघरी दिसत असेल किंवा नसेलही..रोज एक ठरलेला प्रश्न मी सचिन ला नक्की विचारते (हुकूम करते म्हंटल तरी चालेल) अंघोळ कधी करतो आहेस?...त्यावर तो ," जातोय, कळलं ना!" असा वैताग मिश्रित राग दाखवत अंघोळीला जाण्याचं मनावर घेतो.. अंघोळ करणाऱ्यांच्या 2 categories असतात..एक, ज्यांना अंघोळ करताना विलक्षण आनंद मिळतो , त्यामुळे ते अंघोळ झाल्या नंतर नवीन जन्म झाल्याच्या आविर्भावात बाहेर येतात, सचिन सारखे,..तर दुसरे ,ज्यांना अंघोळ हि केवळ औपचारिकता वाटते , त्यामुळे ते अं घो ळ हि ३ अक्षर उच्चारायच्या आत बाहेर आलेली असतात, कावळ्याची अंघोळ करणारे , माझ्यासारखे.. म्हणूनच सचिन सारख्या लोकांना आंघोळीचं वेळापत्रक केलेलं आवडत नाही , ते दिवसभरात कधीही व कितीही वेळ अंघोळ करू शकतात..तर माझ्यासारखे," एकदाची करून टाकूया ती अंघोळ" म्हणून प्रकाश वेगाने अंघोळ करून येतात. मुद्दा काय , तर अंघोळी वेळेवर व्हाव्या आणि घराचं वेळापत्रक बिघडू नये..पण त्यावर "माझ्या अंघोळीचा आणि घरातल्या रुटीन चा संबंध काय?" असा निरागस प्र