निर्धास्त..
काल पासून एक विधान चर्चेत आलं.."आपली तयारी आहे कोरोना बरोबर जगायची , पण कोरोना ची तयारी आहे का आपल्याला त्याच्या सोबत जगू द्यायची"..
याचं उत्तर आहे 'हो'...त्याची तयारी आहे..म्हणून तर तो एवढा चिवट झालाय की जाता जात नाहिये..ठीक आहे..राहा बाबा..आता काय..
यावर लस तयार होण्याची प्रक्रीया सुरू आहे..ती येईलही काही दिवसात..तोपर्यंत काय? असंच घाबरत बसाचंय आपण?
मला आठवतं गर्दीच्या रसत्यावर किंवा भाजी मंडईत गेले की माझी बडबड सुरू..हा रस्ता शांत असता तर ..किती गर्दी किती आवाज हा..नको हे सगळं..आज जाणवतंय ही वाक्य किती महागात पडली..गर्दी हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक झाला आहे आणि त्यासोबतच आपण जगलं पाहिजे तेही विनातक्रार..उलंट असं म्हणावं लागेल की गर्दी ही आपली संस्कृती आहे..त्याचा स्वीकार केला पाहिजे.. आज सगळीकडे आपल्याला आवडते तशी शांतता आहेच की..शाळा शांत..का-यालय शांत..गल्लीबोळ मोठाले रस्तेही शांत..पण ही अशी शांतता काय उपयोगाची..? कला-क्रीडा-पर्यटन-खरेदी-विक्री आणि बहुतेक सर्व क्षेत्राच्या व्ययसायाचा अमुलाग्र भाग म्हणजे गर्दी..तेव्हा..गर्दी होणारंच आहे..झालीच पाहिजे..शहरं धावलीच पाहिजेत..त्यातंच जीवंतपणा आहे आणि आपल्या देशाची प्रगती आहे..
एरवी याच गर्दीत मिसळताना आपण निर्धास्तपणे सगळ्यांबरोबर देवळात देवापुढे डोकं टेकतो..आपल्या मुलांनाही एवढी गर्दी असलेल्या शाळेत पाठवतो..क्लास ला पाठवतो..मुलं आनंदाने एकमेकांसोबत खेळतात,नाचतात..डबा खातात..गणपतीत निर्धास्तपणे याच गर्दीत आपण एकरूप होऊन जातो..बस स्थानक, रेल्वे स्टेशन, एअर पोर्ट किती ठिकाणी निर्धास्त वावर असतो आपला..मंडईत अगदी मोकळेपणाने एवढाल्या गर्दीत भाजी घतो..एखादी मैत्रीण भेटते..तिला गप्पा मारता मारता टाळी देतो..सुखरूप परततो आणि पुढेही तसेच राहतो.. आहो एवढंच काय..घरी रोज येणा-या कामवल्या मावशा ज्या आज येत नाहीयेत त्यांच्या शिवाय पान हलतं का आपलं एरवी?. स्वत: घर समजून त्या आपल्या घरात वावरतात..तेव्हा भितीचा नामोनिशाणही नसतो..हे सगळं आपण निर्धास्तपणे करतोय..करत आलोय..
जी काळजी घ्यायची ती घेतलीच पाहिजे..नि:संदेह..पण म्हणून घाबरट का व्हायचंय? याहीपेक्षा मोठी संकट झेलली देशाने..हा कोरोना व्हायरस कोण लागून गेला..? कोरोना होईल या भितीने आधी मरू आपण..अशाने कोरोनाच्या अंगावर मूठभर मांस चढेल आणि आपल्या अंगावरचं मांस हळू हळू कमी होईल..हीच शंका आणि भिती आपल्यात निर्माण व्हावी आणि ती वाढत जावी याकरता हे सगळं ठरवून केलं गेलंय..कोरोना पेक्षाही ही भिती जास्तं गंभीर आहे..त्यावर आधी इलाज झाला पाहिजे..परीक्षा भिती विरुद्ध जिंकायची आहे..आपण आणि आपला देश घाबरट नाही हे दाखवून देण्याची आहे. रोगावरती इलाज तयार होतात..पण भितीवर कुठलंही औषध नाही..ती आपली आपल्यालाच संपुष्टात आणायचिये..या भिती विरुद्ध कायमचे जिंकलो की आपला देश एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमधे आहे..आणि ते आपण साध्य करणारच आहोत..
Comments
Post a Comment