Posts

हरे कृष्ण...

Image
    रविवार सकाळ सगळ्यांसाठी खास नाही का? शाळेत जाणारी मुलं असो किंवा मोठी माणसं..उद्या रविवार हे माहिती असल्यावरंच निम्मा खूश होतो माणुस..हा असा एक दिवस आहे की ज्या दिवशी आपल्यावर घडाळ्याचं वर्चस्व नसतं..       माझी शाळा कायम सकाळची..त्यामुळे रात्री लौकर झोपा..सकाळी लौकर उठा हेच रोजचं चक्र..असं आसल्यामुळेच मला रविवारी थोडं उशीरा उठण्याची मुभा होती..मात्र तरी ,माझा रविवारचा एक गजर होता..टी.व्ही  वर "कृष्णाssssss" असं ऐकू आलं रे आलं की मी उठायचेच...श्री रामानंद सागर कृत "श्रीकृष्ण" तेव्हा दर रविवारी सकाळी 9 वाजता दूरदर्शन वर लागायची..यात एक श्रीकृष्ण भेटायचा तर त्यानंतर 10 वाजता सुरु होणा-या श्री.बी.आर.चोप्रा यांच्या 'महाभारतात' भेटायचा तोही श्रीकृष्णच..       बालवयात मनावर गारूड घालणा-या या दोन मालिका आजही तितक्याच प्रभावी ठरतात म्हणजे बघा! पण त्या लहान वयात इतर पात्र किती समजत असतील ठाऊक नाही पण मनात घर करतात ते भगवान श्रीकृष्ण..ते परमेश्वर आहेत..शाश्वत आहेत..तरी ते मनुष्य रूपात अवतरले आहेत. म्हणूनच मनुष्य जन्माच्या मर्यादा बंधनं ...

पाहुणा

Image
 आमच्या घरच्या बागेत झाडं पुष्कळ..वावरायला भरपूर जागा..मांजरं-लहान मोठे पक्षी-फुलपाखरं हे आमच्याकडे रोज येणारे पाहुणे..खरं तर त्यांना पाहुणे म्हणणं चुकीचंच..हे अवघं विश्व त्यांचं घर..त्यांनी केव्हाही आणि कुठेही मुक्त विहार करावा..अगदी मनमुराद..   साधारण वर्षा दीड वर्षा पूर्वीची गोष्ट..माझे नृत्य वर्ग घरातच तळ मजल्याला..अगदी बागेला आणि अंगणाला लागून..येण्याजाण्याला तसं बंधन नाही..नेहमेप्रमाणे मुलींचा वर्ग सुरू होता..तेवढ्यात बाहेरून कणी चालत असल्याचा आवाज आला आणि अचानक समोर देव प्रकट व्हावा तसं बाहेरुन टुणकन उडी मारून एक मांजरीचं पिल्लू आत आलं..आम्ही सगळ्या..मी आणि माझ्या विद्यार्थिनी क्षणभर दचकलो..पण ते छोटंसं गोंडस पिल्लू पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडलो..आवाजाची दिशा हेरत हे पिल्लू आत आलं होतं..अजिबात न घाबरता जणू काही जन्मो जन्मीचा संबंध असावा असं ते आमच्यापाशी आलं..माझ्या सगळ्या विद्यार्थिनी प्राणी प्रेमी..त्यामुळे कुणालाही,  त्या न कळवता आलेल्या पाहुण्याचा त्रास नाही झाला..(न कळवता येणा-या पाहुण्यांचा अनुभव सगळ्यांना असेलच)उलटं क्लास राहिला बाजुला आणि या पिल्लामागेच ...

साधना ताई आणि 'समिधा'

Image
    साधारण 18 वर्षांपूर्वीची गोष्ट..माझे वय वर्ष 14..इयत्ता नव्वीत..त्या वेळी माझे बाबा नागपूर येथे नोकरी निमित्त कार्यरत होते..दिवाळीच्या सुट्टीत मी आणि आई नागपुर ला गेलो..ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी वरोरा येथे वसवलेल्या आनंदवन ला भेट द्यायची माझ्या बाबांना खूप इच्छा होती. थेट संबंध नसला तरी वाचनाच्या माध्यमातून आणि त्या आधीपासून गेली अनेक वर्ष माझे आजोबा, बाबा आनंदवन ला जमतील तशा फूल ना फुलाची पाकळी स्वरूप देणग्या नक्की पाठवत असत..आणि त्याचा अभिप्राय म्हणून डॉ.विकास आमटे यांच्या सुरेख हस्ताक्षरातले पत्र आजोबांना येत असे..आमच्याकडे सुद्धा अभिप्राय म्हणून आनंदवनातून तेथील रहिवासियांनी हाताने तयार केलेले भेट कार्ड येत असे..   अशा या सुंदरशा आनंदवन ला भेट देण्याचे आमचे नक्की ठरले..एका स्नेह्यांच्या ओळखीने वार्तालाप करून एक रात्र राहण्याची सोयही तिथेच  झाली..आई-बाबा आणि मी, बस ने आनंदवन ला पोहोचलो..राहण्याच्या ठिकाणी सामान ठेवल्यावर एका स्थानिकाने आनंदवन शी आमचा परिचय करून दिला..रुग्णालयं..वेगवेगळे प्रकल्प, शेती, टाकाऊतून टिकाऊ ते अगदी भूकंपापसून...

मोबाईल फोन उवाssच

Image
    हॅलोss ....हो..आज मी म्हणतोय हॅलो...एरवी तुम्ही सगळे म्हणता ना मला उचलल्यावर..म्हणून म्हटलं आज आपणंही म्हणून बघावं कसं वाटतंय..ओळखलंत का नाही मला..? हो हो तोच मी...जो कधी एके काळी बांधलेला असायचो आता मोकाट असतो..अहो तोच ओ..ज्याच्याशिवाय तुम्ही सद्ध्या जगू शकत नाही..सकाळी उठल्या उठल्याही मी लागतो आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा मीच लागतो..हां..आता बरोबर ओळखलंत..तुमचा जिवाभावाचा मोबाईल फोन मी..    मला फारंच भारी वाटतं बुवा..खरं तर मी एक वस्तू..ज्याला तुम्हीच निर्माण केलंत..पण आज माज मी करतोय की!!! हल्ली बघावं त्याच्या हातात मीच आणि माझे सख्खे चुलत भाऊच सगळे..अहो म्हणजे..मी जर samsung चा फोन तर ..redmi ..one plus 7 आणि आमच्यात सर्वात श्रीमंत चुलता म्हणजे i phone...सगळीकडे मी आणि माझे चुलतेच... आम्हीच राज्य करतोय..बरं त्या माझ्या सावत्र भावंडांबद्दल नाही बोलत मी..desktop, laptop, tab..तसं आमचं जमतं पण तरी फारसा contact नसतो त्यांच्याशी..अहो का काय? मी रोज तुमच्या बरोबर..उठता आणि खिशात घालता..ही सावत्र भावंड नेहमीच असतात तुमच्यासोबत असं नाही ना..आणि असली तरी माझ्याशिव...

दहावीतलं 'lockdown'

Image
    खरं तर लोकहो..दहावी या विषयावर एक आद्य ग्रंथ लिहिता येऊ शकेल नाही का? म्हणजे आपलं मूल 10 वीत गेलं की कुणी कुणी कसं कसं वागावं, मुलांनी काय करावं..स्वत: आई वडिलांनी कसं वागावं..आजी आजोबांनी कसं वागावं..मित्र-मैत्रिणींनी कसं वागवं ते अगदी शेजा-यांनी सुद्धा कसं वागावं..     अगदी 9 व्वी पर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं..अचानक 10 वी ला गेलं की काय माशी शिंकते देव जाणे..सर्वात मोठं पाऊल म्हणजे केबल बंद करणे..म्हणजे एवढी वर्ष टीव्ही बघूनही चांगली पास होणारी मुलं अचानक 10 वी च्या वर्षाला गेल्यावरंच काय ते टीव्ही पाहून नेमके नापास होतील अशी भोळसट (का बावळट म्हणतात ते) समजूत आई बाबांची असते..इथे बसतो पहिला घाव..     मग येतो दुसरा.."ती खेळायला येणार नाहिये तिला अभ्यास आहे"..किंवा 'अहो काकू, जरा टीव्ही चा आवाज कमी करता का? माझा मुलगा अभ्यास करतोय"..असं शेजा-यांना सांगायचं..अहो अभ्यासासारखं काहितरी असतंच की आपल्याला 1 ली ते 9 वी..ते करतो आपण आणि पास होतो दर वर्षी..मग आत्ताच खेळण्याचा वेळ तेवढा कमी झाला की कसा काय अभ्यास होणार बरं..?    ...

कुकर

Image
   आज सकाळी चहा घेत बसले होते..गॅस वर कुकर लावला होता..हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका..20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..बरोबर आहे..आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच..वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात..पण घरात वापरायला दुसरा कुकर असला तरी हा कुकर सासूबाईंना प्राणांहून प्रिय आणि म्हणूनच डॉक्टर जसा रुग्णाला वाचवायचे आटोकाट प्रयत्न करतात तसेच प्रयत्न माझ्या सासूबाई या कुकर ला वाचवण्यासाठी करत असतात..त्याचे स्क्रु पुन्हा पुन्हा बसवून आणतात..वाफ धरत नसली की रिंग बदलतात..नाही नाही..चुकलं..बसवून आणायला सांगतात ..कुणाला? अहो असं काय करताय..'क्षणाचा सवंगडी आणि अनंतकाळचा गडी'...ओळखलं असेलंच तुम्ही.. नवरा..    आणि माझे सासरे अगदी निमुटपणाने दर वेळी तितक्याच उत्साहाने कुकर दुरुस्त करून आणतात..माझ्या मनात नेहमी विचार येतो..एकदा तरी सासरे वैतागले असतील..की नाही बाबा मी नाही जाणार..नवीन कुकर आणू आपण आता..पण कसं काय दे...

लळा 🥰🥰🥰🥰

   ही एक अशी भावना आहे जी वय, जात,पात, धर्म, वर्ण सगळ्याच्या पलिकडे घेऊन जाते..इथे आपण, हा माणुस आहे का प्राणी आहे का पक्षी आहे का हे एक वृक्ष आहे असा भेदभाव नक्कीच करत बसत नाही.. एकदा का लळा लागला की वाटणारी ओढ आपण रोखू शकतो का?     खूप दिवसांपासून जे पाहत आले त्या बद्दल आज लिहावंसं वाटलं..आमच्या समोरच्या बंगल्यात खडतरे नावाचं वृध्द दांपत्य गेली बरीच वर्ष राहतंय..अगदी जक्ख म्हातारे नसले तरी साधारण 70 री च्या आसपास दोघांची वयं असतील..त्यांची मुलं बाळं बहुदा मुंबईकडे स्थायिक असावी..काही निमित्तानेच त्यांचं इथे येणं होतं. पण सुख वस्तू कुटुंब आहे..आजोबा तसे ठणठणीत, अजूनही कार्यरत आहेत..आजींना वयोमानानुसार काही तक्रारी आसल्यातरी घरातल्या घरात का होईना हिंडत्या फिरत्या आहेत..     बंगल्या मागच्या outhouse मधे त्यांचं मदतनीस कुटुंब राहतं..नवरा बायको आणि त्यांची 2 लहान मुलं..मुलगा साधारण 5-6 वर्षांचा आणि मुलगी 2 वर्षांची..आपलंच घर आणि हे आपलेच आई वडील समजून हे दोघे घरात सगळी व्यवस्था पाहतात..बंगल्याची स्वच्छता, स्वयंपाक पाणी , बाहेरची महत्वाची कामं..ते अगदी आजोबा क...

शाळेकडली वाट

Image
  हे शीर्षक वाचल्यावर आपल्या सगळ्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील नक्की..आपल्या बालपणापासून ते कळत्या वयाला (असं म्हणायचय😅 फक्त) पोहोचेपर्यंत आपली खास मैत्रीण म्हणजे आपली शाळा..आणि विषेश करून जर आपण सलग काही वर्ष एकाच शाळेत गेलो असलो तर आपलं एक वेगळं नातं जमून जातं तिच्याशी..पण याइतकंच आपल्याला काय आठवत असेल तर तो शाळेकडे जायचा रस्ता..कळत नकळत या वाटेशी सुद्धा आपलं एक नातं होऊन जातं..   माझी शाळा म्हणजे बदलापूरची इंडियन एज्युकेशन सोसायटीची कात्रप विद्यालय..इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी (6वी 7वी वगळता) असा मोठा काळ मी या शाळेची विद्यार्थिनी होते.. 1993-2003 ...बदलापुरात  कात्रप नावाचं छोटं गाव होतं..त्यानजिक शाळा असल्यामुळे शाळेला कात्रप विद्यालय असं नाव..बदलापूर हे, शहर म्हणून तेव्हा पूर्ण विकसित नव्हतं..काही भागात तेव्हाही अगदी खेडं नाही तरी गाव संस्कृती जपली होती..हे गाव पार करून पुढे गेलं की शाळेची इमारत दिसे..तेव्हा तरी शाळेकडे जायला हा एकच रस्ता होता..   शाळा तशी घराजवळंच होती..कधी चालत..कधी सायकल वरून अशी मजा करत आम्ही शाळेत जायचो..कात्रप गावातून शाळेकडे जाय...

निर्धास्त..

Image
   काल पासून एक विधान चर्चेत आलं.."आपली तयारी आहे कोरोना बरोबर जगायची , पण कोरोना ची तयारी आहे का आपल्याला त्याच्या सोबत जगू द्यायची"..    याचं उत्तर आहे 'हो'...त्याची तयारी आहे..म्हणून तर तो एवढा चिवट झालाय की जाता जात नाहिये..ठीक आहे..राहा बाबा..आता काय..    यावर लस तयार होण्याची प्रक्रीया सुरू आहे..ती येईलही काही दिवसात..तोपर्यंत काय? असंच घाबरत बसाचंय आपण?    मला आठवतं गर्दीच्या रसत्यावर किंवा भाजी मंडईत गेले की माझी बडबड सुरू..हा रस्ता शांत असता तर ..किती गर्दी किती आवाज हा..नको हे सगळं..आज जाणवतंय ही वाक्य किती महागात पडली..गर्दी हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक झाला आहे आणि त्यासोबतच आपण जगलं पाहिजे तेही विनातक्रार..उलंट असं म्हणावं लागेल की गर्दी ही आपली संस्कृती आहे..त्याचा स्वीकार केला पाहिजे.. आज सगळीकडे आपल्याला आवडते तशी शांतता आहेच की..शाळा शांत..का-यालय शांत..गल्लीबोळ मोठाले रस्तेही शांत..पण ही अशी शांतता काय उपयोगाची..? कला-क्रीडा-पर्यटन-खरेदी-विक्री आणि बहुतेक सर्व क्षेत्राच्या व्ययसायाचा अमुलाग्र भाग म्हणजे गर्दी..तेव्हा..गर्दी ...

आगळी अभिव्यक्ती

Image
    आपल्या पैकी ब-याच घरांत आजी-आजोबा असतील...आजी-आजोबा म्हणजे वृद्ध..साधारण 80-85 किंवा त्याहून अधिक वय पार केलेले..पण तब्ब्येतीने तसे ठणठणीत..स्वत: स्वत:चं सगळं दिनमान पार पाडू शकणारे..       आमच्या घरात आजोबा, वय वर्ष 93 आणि आजी वय वर्ष 85-86(नात्याने माझे आजे-सासूसासरे) अशी ठणठणीत जोडी आहे..ठणठणीत शब्दावर अशासाठी जोर दिला की काही तब्ब्येतीच्या गंभीर तक्रारीच्या दिव्यातून जाऊन सुद्धा त्यातून पूर्ण बरे होऊन हे दोघे आनंदाने जगताहेत..       आजींना एका कानाने अजिबात ऐकू येत नाही..मला तर कधीतरी वाटतं दोन्ही कानांनी असावं..कारण त्यांना काहीही सांगायचं झालं की काही वेळाने मला धाप लागते इतक्यांदा..आणि इतक्या जोराने सांगावं लागतं...कानाचं यंत्र न वापरण्याच्या यांच्या सारख्या बहुतांश आज्यांशी घरोघरी असाच संवाद होत असावा..😅😅पण आजोबांना मात्र मी एकच गोष्ट आजींना ऐकू न आल्यामुळे 7 ते 8 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना ऐकलंय..😅😅इतक्यांदा सांगून जेव्हा आजीला कळतं तेव्हा आपण मात्र world cup जिंकल्याचा जितका आनंद क्रिकेट प्रेमिंन...

प्रिय बूझो

Image
    आज बरोबर 5 वर्ष झाली तू आमच्यात नसून..5 वर्ष..म्हटलं तर मोठा काळ..पण एक तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस..तुझी आठवण आली नाही असं झालंच नाही कधी..या निमित्ताने तुला हे प्रेमाचं पत्र..      तशी मी कुत्र्यांना घाबरणारीच बरं का? त्या टोकाला कुत्रा दिसला की या टोकावरून मागे फिरणारी..आता मात्र वाटतं, का नाही भिती घालवायचा प्रयत्न केला मी आधी?..जगातल्या सर्वात सुंदर प्रेमाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न का नाही केला कधी?      लग्ना अगोदर मी इथे घरी यायचे तेव्हा मी दिसल्या दिसल्या तू इतका भुंकायचास की मी गेट उघडून आत यायलाही घाबरायचे..तेव्हा वाटलंही नव्हतं की पुढे तू माझा खास दोस्त होशील..      2006 साली जेव्हा तुला सचिन ने घरी आणलं तेव्हा आम्ही कॉलेज च्या दुस-या वर्षाला होतो..दोन अडीच महिन्यांचा होतास तू..छोटासा.. मस्तीखोर..घरभर फिरायचास..खुर्चीवर चढून बसायचास..या गमती जमती कळायच्या मला आणि हे सगळं मी miss केल्याचं वाईटंही वाटायचं..      आमचं लग्न ठरल्यावर एक गोष्ट माझे बाबा मला नेहमी सांगायचे..बूझो जेव्हा तुला accept करेल ते...

प्रेरणास्रोत...

Image
  गणित विषयाशी माझी गट्टी जमली नाही ती नाहीच कधी..बेरीज, वजापाकी, गुणाकार, भागाकार, पाढे पाठ करणं हे सगळं मी शाळेत असताना केलं ते केवळ नाइलाज म्हणून ..नावडता विषय तर तो होताच माझा पण मला भिती होती गणिताची..phobia..म्हणजे लोकांना उंचीचा phobia असतो..अंधाराचा असतो..तसा मला गणिताचा..माझ्या मनाने हे ठरवलेलं असायचं की बास हे आपल्याला येणार नाही..एखादं गणित सोडवायला पहिली step काय इथेच मुळात डोकं चालत नसे..भिती मुळे मी गणिताचा अभ्यास तसा नावडीनेच करायचे..पण डोक्यात घुसतंय का हे बघायचेच नाही..आणि ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी मला काहिही येत नाही या भितीने भोकाड पसरायचे..मग आई ची थोडी बोलणी खायची..ती समजावेल तितकं समजून घ्यायचं आणि पेपर द्यायचा..आईच्या प्रयत्नांमुळे मी गणितात कधी नापासही झाले नाही किंवा काठावर pass ही झाले नाही..खूप भारी नसले तरी ok marks मिळायचे..गेल्याजन्मी काय पापं केली आणि गणित विषय या जन्मात भेटला असं नेहमी वाटायचं मला..     पण या सगळ्याला छेद दिला तो पाचवीच्या वर्षाने..आईने माझ्यापुढे हात टेकले आणि मला गणिताचा क्लास लावला...मुळात जो विषय मला आवडत नाही त्य...

फणस

Image
    निसर्गाच्या किमयेतील मला ठाऊक असलेला हा आविष्कार की जो खरं तर फळ आहे का भाजी हे कोडंच कधी उलगडलेलं नाही..    प्रथिनं , खनीजं , कर्बोदकं या आणि अशा अनेक पोषण मूल्यांचा खजीना फणसात आहेच..शिवाय झाड म्हणूनही फणस उपयुक्त..फणसाच्या लाकडाला वाळवी लागत नसल्यामुळे फर्निचर साठी याचा भरपूर वापर होतो..गराचा भाग सोडल्यास उरलेला 55 ते 65% भाग हा प्राण्यांसाठी खाद्य म्हणूण उपयोगाला येतो..    वा..काय कमाल आहे निसर्गाची..म्हणजे बघा हां..तसं फणस हे स्वयंभू झाड..अपोआप रुजतं ..आपोआप वाढतं ...स्वत: स्वत:ला बहरवतं..तसा maintainence काहीच नाही..आणि असं सगळं असूनही या फणसाचं कोडं उलगडंत नाही..ज्यांना भाजीतून आनंद मिळतो अशांसाठी तो भाजीच्या रुपात समोर येतो..ज्यांना गरे किंवा साटं आवडतात त्यांच्यासाठी तो फळ म्हणून प्रकटतो..आणि एवढं सगळं असूनही हे असं का याचं उत्तर आपल्याकडे नाही.    माणसांचं पण असंच असतं का? आपण म्हणतो ना  "हा माणुस काही बुवा आपल्याला अजून समजत नाही..". म्हणजे पाहिलं तर त्याचं सगळं वागणं बोलणं उघड उघड असतं..मनमिळावू असतो..चार लोकांप्रमाण...

संधी

Image
   या अशा परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल असं कुणाला कधीही वाटलं नसेल..पूर्वी साथीचे रोग यायचे. मात्र औषधोपचाराअभावी आणि पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यात लोकांना जीव गमवावा लागायचा असं फक्त ऐकलेलं..    पण आज विज्ञानाची एवढी प्रगती झालेली असताना सुद्धा 2020 मधे आपल्याला या संकटाला तोंड द्यावं लागतंय..."छे ओ, पूर्वी रोगांची साथ यायची..तेव्हा मरायचे लोक..आता असं होत नाही" या आपल्या over confidence ला एक सणसणीत चपराक निसर्गाने दिली..    एवढंच नव्हे तर 'मी मोठा तू लहान'..'माझा देश छान' 'तुझा नाही'..आम्ही जास्तं भारी तुम्ही नाही वगैरे सगळ्यावरून आपण धाडकन खाली आपटलो आहोत..आज अक्खं जग locked down आहे..कुणाचं जास्तं आर्थिक नुकसान झालंय तर कुणाचं कमी..पण नुकसान सगळ्यांचं झालंय हे नक्की..आज आपल्या जाती धर्मांचे फक्त कागद उरलेत..कुणी हिंदू नाही, मुसल्मान नाही, मराठा नाही.. आपण फक्त आणि फक्त भारतीय आहोत..    आज आपण सगळे एकाच बोटीतले प्रवासी झालेलो आहोत..बोट बुडण्याच्या मार्गावर असताना ती वाचावी या करता सहप्रवासी म्हणून आपल्याला ज...

Good vibes only

Image
  10 वर्षांपूर्वी चं चक्र पुन्हा फिरलं..तेव्हा स्वाइन फ्लू  आणि आत्ता कोरोना...सद्ध्या कोरोना व्हायरस ला जितकी publicity मिळते आहे तितकी क्वचितच कुणा जिवाला मिळाली असेल पृथ्वीतलावर..हो..तो सुद्धा जीवच शेवटी..तो म्हणत असेल की आता आलोय त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे..जसा एखादा परदेशी पाहुणा इथे आला की म्हणेल..मिम्स म्हणू नका..जोक म्हणू नका...animations म्हणू नका..आणि असे काही साथीचे रोग आले आपल्या इथे की प्रत्येक माणसातला एक सूप्त डॉक्टर जागा होतो..आपल्या अल्पमतीने प्रत्येक जण उपाय सुचवत बसतो..खिशात कापूर ठेवा..कानात निलगिरीत बुडवलेला कापसाचा बोळा ठेवा..उपायांचं थैमानच जणू..आणि हे असे forwards वाचून लोकांमधे एकच गोंधळ उडतो..कालपर्यंत ठणठणीत असलेले आपण अचानक आजारपणाच्या..किंबहुना मरणाच्या भितीने ग्रासले जातो..    सतत एकच एक वाचून, ऐकून, त्या बद्दल बोलून आपण फक्त नकारात्मकता पसरवतो आहोत..सगळीकडे भिती, संशय, किळस पसरते आणि यातूनच रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे..त्यामुळे सकारात्मक विचार ही या परिस्थितीशी लढा देण्याची पहिली पायरी..आपण पूर्णत: शारीरिक आ...